इतिहासमधील भूगोल
गौतम - ज्यांनी दक्षिण गंगा गोदावरीला जमिनीवर आणले ते. अहिल्या - गौतम ऋषी यांची पत्नी. अंजनी - गौतम आणि अहिल्या यांची मुलगी आणि हनुमानाची आई तसेच केसरीची बायको. यावरून हनुमानाचा आणि महाराष्ट्राचा सबंध कळतो. रेणूका जमदग्नी पुत्र परशुराम हा कोकणास्थांचा मुळपुरूष तर देशस्थ पार्वती शंकर पुत्र स्कंद ( खंडोबा ) ला स्वतःचे कुलदैवत मानतात . परशुरामाच्या कृपेने सर्व कोकणस्थ शाकाहारी आहेत . सह्याद्रीच्या पश्र्चिमेची जमीनच समुद्राकडून मागितल्याचा संदर्भ पुराणात येतो . आणि एका दूध देणाऱ्या गायीसाठी सहस्त्राबाहू शी लढून जिंकणारा ब्राम्हण चौकटीत बसत नाही म्हणून एक तर नक्की की ब्राम्हण चौकटीच्या बाहेरील माणसाला समाजात ठेवत नाहीत. म्हणून की काय शाकाहारी कोकणात सुरू झालेली नारळ फोडण्याची प्रथा सर्व ठिकाणी आज प्रसिद्ध आहे जी की कोणत्याही बळीला पर्याय म्हनून आहे पण ती मूळ बळी प्रथा नाही. पुढे पौंड्रुक नावाचा कृष्णाचा बहिरुपी होता आणि पौंड्र वरून ज्याचा प्राकृत अपभ्रंश पांडुरंग आणि पंढरपूर असा झाला . आणि औंड्रा ते आंध्र आणि राष्ट्रकूट ते रेट्टीकुडी - रेड्डी तसेच महारठ्ठा ते मराठा हे नावरूपास आले...